मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

शेवट (पार्ट २.......)

राजकारण हा एक सारीपाटच असतो. इथं मतदानाच्या दिवसापर्यंत सगळ्याच पक्षांनी आपापल्या चाली प्रतिचाली खेळायच्या असतात आणि शेवटी जनता चेकमेटची एक चाल चालत असते, मग ती चाल समजून घेऊन पुढच्या चाली ठरवायच्या असतात. इथे कुठलीच चाल शेवटची नसते, प्रत्येक निवडणूक वेगळी असते, प्रत्येक निवडणुकीचा स्वभाव वेगळा असतो. पण जनतेचा धडा दुर्लक्षित केला किवा चुकीचे आणि मनमानी तर्क लाऊन हवा तसा समजून घेतला तर पुढच्या निवडणुकीत जनता अजून मोठा धडा शिकवते. जनतेनं महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला एक संकेत दिलेला, दिल्लीच्या निवडणुकीत इशारा आणि बिहारच्या निवडणुकीत राजकीय चपराक. विजयी आणि पराजित अशा दोन्ही आघाड्यांनी सोयीचे अर्थ घेणं एव्हाना सुरूही केलंय. फक्त आकडे पहायचे तर राजद ८० जदयु ७१ कॉंग्रेस २७ भाजपा ५३ मित्रपक्ष ७ आणि उरलेले इतर काही पक्ष किवा अपक्ष उमेदवार. पण निवडणूक हा फक्त आकड्यांचा खेळ नसतो. प्रत्येक निकालात स्पष्ट दिसणारे, भासणारे पण प्रत्यक्षात नसणारे आणि न दिसणारे पण दूरगामी परिणामकारक ठरणारे अनेक अर्थ असतात.
या निवडणुकीन भाजपसाठी दिलेला सगळ्यात मोठा इशारा म्हणजे भाजपचे होत असलेलं कॉंग्रेसीकरण थांबवण्यासाठीचा. शासकीय आणि प्रशासकीय नाही पण पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणात भाजपा कॉंग्रेसच्या वाटेवरच जाऊ पाहतोय. package चा गाजर ही तसंतर काँग्रेसी परंपरा पण या महिन्यात २ निवडणुकीत भाजप त्या नीतीचा वापर करताना दिसला आणि दोन्ही ठिकाणच्या निकालांनी हा धडा दिला की package च्या मोठमोठाल्या आकड्यांकडे पाहून भुलण्याचे दिवस गेले आणि या नीतीचा त्याग भाजपा जितक्या लवकर करू शकेल तितकं चांगलं. दुसरं आणि महत्वाचं कॉंग्रेसीकरण म्हणजे नकारार्थी आणि भीती दाखवून मत मिळवू पाहणारा प्रचार. गेली लोकसभा निवडणूक बघा, मोदीजी वगळता सारे पक्ष आणि कॉंग्रेसही नकारार्थी आणि कशाची तरी भीती दाखवू पाहणारा प्रचार करत होते. म्हणजे मोदी पंतप्रधान झाले तर देशात अराजक माजेल, हुकुमशाही येईल वगैरे वगैरे आणि या वेळी तसाच प्रकार भाजपकडून चालू होता. बाकी एकाच व्यक्तीकेंद्रित चालणारं राजकारण, ठळकपणे एखादा चेहरा न देणे, राज्य नेतृत्वाला निर्णय प्रक्रियेत सामावून न घेण, प्रचारात मोठमोठा ताफा उतरवण असं ठळकपणे पाहता येईल इतकं साम्य या निवडणुकीच्या भाजपच्या रणनीतीत आणि कॉंग्रेसच्या तेव्हाच्या रणनीतीत होतं. मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर असलं तरी या निमित्तानं भाजपला बऱ्याच गोष्टींची नव्यानं मांडणी करावी लागणारय. लोकसभा निवडणुकीतला बराचसा मतदार या निवडणुकीतही स्वताकडे राखण्यात भाजपा यशस्वी झाली असली तरी विरोधकाचा विरोधक तो कसाही असला तरी तो मित्र, निवीन मित्र बनवताना जुन्या मित्रांना दुखावणं आणि विरोधी गोटातल्या कुणालाही निवडणुकीच्या तोंडावर पवित्र करून घेऊन निष्ठावान सैनिकांचं खच्चीकरण करणं या अशा आत्मघातकी वृत्तीस नियंत्रणात ठेवावच लागेल. तसेच शहा यांच्यासारखा अतिआक्रमक चेहरा जनतेला पक्षाशी कनेक्ट करू शकतो का? ते पक्षासाठी नायक म्हणून जास्त उपयुक्त सिद्ध होतील की पडद्यामागचा निर्देशक म्हणून याचा विचार करण्याचीही वेळ बिहारच्या निकालांनी आणून ठेवलीय आणि यापासून पळ काढणं अधिक नुकसानदायक. अजून एक महत्वाचं इशारा की मोदींच्या नावावर काहीही खपवून घेण्याच्या मनस्थितीत जनता नाहीये. मोदींनाही आता प्रचारकी वस्त्र त्यागून पूर्ण वेळ पंतप्रधान बनाव लागेल कारण ३० सभा घेऊनही फक्त ५३ आमदार निवडून आणणं ही गोष्टच मुळात त्यांची प्रतिमा धुसर करणारी आहे आणि वेळीच सावरला नाही तर येत्या लोकसभेत त्यांच्या कुठल्याच गोष्टीत नाविन्य नसणारय आणि त्या महत्वाच्या लढाईत ते एकही प्रभावी भाता नसलेला योद्धा आणि भाजप प्रभावहीन नेतृत्वाचा पक्ष ठरण्याचा धोका आहे.
बाकी एकेकाळचा बिहारचा पटावरचा किंग आता किंगमेकर म्हणून परतला आहे. २४/२८ आमदारांसह अगदीच प्रभावहीन झालेले लालूजी आणि त्यांचा राजद राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून परतले आहेत. त्यांची दुसरी पिढी स्थिरावू पाहत असताना लालूजी त्यांना कायमच ऊपमुख्यमंत्री म्हणून थोडी न पाहू इच्क्षीणार आहेत. उद्या स्वताच्या मुलासाठी मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या इच्छेन लालूंची पावलं पडायला लागली तर आश्चर्य नको. इतकं मात्र नक्की की जास्तीचे आमदार मिळवून देऊन लालूंकडे एखादं ज्यादा मंत्रीपद आणि थोरलेपण जाईल अशी व्यवस्था करून जनतेनं नितीशकुमारांना मर्यादित केलंय.
नितीशकुमार या निवडणुकीत हिरो म्हणून पुढे आले आहेत आणि जनतेनही त्यांच्या नेतृत्वार वर विश्वास दाखवला आहे. पण या विजयाच्या मागही एक पराभव दडला आहे. ११५ आमदारांसह मागच्या विधानसभेत जवळपास पूर्ण बहुमतात (फक्त ७ सीट दूर) असणारा नितीशकुमारांचा जदयु आज ७१ आमदारांसह बहुमतापासून तब्बल ५१ सीट दूर आहेत आणि सरकार चालवताना त्यांना कॉंग्रेस आणि राजदच्या नाकदुऱ्या ह्या काढाव्याच लागतील. आणि स्वप्रतीमेसाठी सरकारचा एखादा निर्णय लालूजी रद्द करणारच नाहीत याची शाश्वती खुद्द नितीशकुमारही देऊ शकणार नाहीत. म्हणजे ११५ आमदारांच्या पक्षाला अवघ्या १०० सीट घेऊन लढायला भाग पडणारे नितीशकुमार निवडणुकीअगोदरच नेता म्हणून पराभूत झाले होते आणि त्यांनी पक्षालाही राष्ट्रीय राजकारणात निष्प्रभ करून टाकलंय आणि भविष्यात तर राज्यसभेतील खासदारही कम होतील. जनतेच्या कसोटीत खरं उतरणं ही त्यामुळच त्यांची गरज नाही तर नितांत गरज बनलेली आहे आणि त्यांची आजवरची कारकिर्दी ते तसं करू शकतात हा आशावाद जिवंत ठेवायला लावणारी मात्र जरूर आहे फरक इतकाच आहे की परस्थिती खूप बदलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वताचे ६०% सहकारीही निवडण्याचा अधिकार सध्या त्यांच्याकडे नाही.
राहता राहिली कॉंग्रेस, ४ वरून संख्याबळ २७ वर जाणे ही नक्कीच खूप अभिनंदनीय गोष्ट आहे पण एके काळचा ४०० खासदार असणारा पक्ष इतकं दुबळा झालाय की त्याला फक्त ४० जागा मिळतात लढवायला. आणि २७ वरच तो पक्ष खुश होणार असेल त्यांच्या हितचिंतकांची चिंता वाढवणारी गोष्ट असेल. अजून एक या २७ पैकी किती सीट नितीश-लालू जोडीची मेहरबानी आणि किती आपल्या नेतृत्वाचा करिष्मा व संघटनेच यश हे तोलून मापूनच घ्यावं लागेल आणि तसं झालं तर आणि तरच या पक्षाला भविष्यकाळ आहे. कर्नाटक विधानसभेनंतर बहुधा पहिल्यांदाच कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेलं कुणीतरी मंत्रीपदाची शपथ घेईल आणि हेही नसे थोडका. हा विजय नीट समजून घेतला तर निद्राअवस्थेत गेलेली संघटना जिवंत केली जाऊ शकेल अन्यथा नेते आणि पक्ष अजूनही भरकटत जाण्याची शक्यता अधिक. अधिक म्हणावा लागतंय कारण निकालानंतर राहुल गांधींची शारीरिक भाषा, त्यांची आणि त्यांच्या नेत्यांच्या आकलन आधारीत प्रतिक्रिया.
तसं राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम पडतील. मोदीजी त्यांचा आर्थिक सुधारणेचा वेग वाढवण्याचीही किंवा तसं करण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे आणि पेट्रोल-डीजेल वरील कर वाढवून, gas वरील सुब्सिडी ठराविक लोकांसाठी मर्यादित करण्याचं सुतोवाच करून तसे संकेतही दिले आहेत. विरोधक सुद्धा येत्या अधिवेशनात अधिक एकजूट आणि आक्रमक होतील पण आक्रमकता मर्यादेबाहेर गेली तर जास्तच भरकटूही शकतील. मुलायमसिंह आणि जयललिता यांच्यावर ही बरीच मदार असेल. विरोधकांना ते कमजोर karu शकतील आणि भाजपला हतबलही. त्यामुळं त्यांच्या भूमिकेवर बरंच काही अवलंबून असेल. येत्या जुलै मध्ये बिहारमधून ५ राज्यसभेचे सदस्य निवडून द्यायचे आहेत आणि या निकालामुळ किंचितसा संख्याबळात फरक पडू शकतो पण तो निर्णायक असेल. आणि सर्वात शेवटी देशभर नामोनिशान हरवत चाललेल्या डाव्यांना किंचितसा दिलासा आणि आशादायक संकेत बिहारच्या निवडणुकीन दिला आहे.
थोडक्यात सांगायचं तर नितीशकुमारांच्या रालोआतून बाहेर जाण्यानं सुरु झालेली एक लढाई मध्यात पोहचली आहे, सुरुवातीला बाहेर फेकले गेलेले नितीशकुमार जोमाने मैदानात दखल झाले आहेत. आणि इतका काळ भाजपसाठी सोपी झालेली लढाई तुल्यबळ झाली आहे आणि आत्मविश्वास गमावलेल्या विरोधकांमुळ सोपी झालेली वाट खडतर झालेली आहे. खडतर किती हा प्रवास म्हणतच भाजपला पुढील वाटचाल करावी लागणारीय.

निवृत्ती सुगावे.

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

!!!!!!!खडतर हा मार्ग अजुनी!!!!!! (Part 1)

एका अश्या निवडणुकीचा निकाल आलाय ज्याकडे अनेकार्थाने अनेकजण डोळे लाऊन बसलेले होते. अर्थतज्ञांपासून राजकीय-सामाजिक अभ्यासक आणि सर्वसामान्य जनता. हा एकच निकाल असा होता ज्यानं कित्येक प्रफुल्लीत चेहरे सुकवले आणि हिरमुसलेले चेहरे खुलवले. अनेक अर्थाने ही निवडणूक उत्साहवर्धक होती, दूरगामी परिणामांची नांदी ठरू पाहणारी होती. मग या निकालांचा विश्लेषणही खूप मागचा भूतकाळ आणि खूप पुढचा भविष्यकाळ पाहूनच व्हायला हवा. मुळात या निकालांचा अर्थ लालूंच पुनरागमन, मोदींचा पराभव आणि नितीश यांचा दिग्विजय असा काढणं मर्यादीतच होईल. या निकालांनी कित्येक प्रश्नांची उकल केली आहे पण सोबतच अनेक प्रश्न नव्याने उभे केले आहेत. निवडणुकीने दिलेली धड्यासोबत उभ्या केलेल्या प्रश्नांचा म्हणूनच धांडोळा अगत्याच ठरतो. अजून एक, या निवडणुकीला काही वैयक्तिक नात्यांची किनार आहे तसीच तिरस्कार, उपेक्षा आणि अपमानाचीही किनार आहे.
निवडणूक आयोगानं जरी निवडणुकीची अधिसूचना २ महिन्यांपूर्वी जारी केलेली तरी या निवडणुकीला खरी अप्रत्यक्ष सुरुवात नितीशकुमारांच्या रालोआ मधून बाहेर पडण्यानं झालेली आणि प्रत्यक्ष सुरुवात झाली ती लोकसभेचा निकाल लागला त्या संध्याकाळी.
तसा २-३ वर्षांचा फरक दुर्लक्षित केला तर नितीशकुमार आणि मोदी यांचा राज्याभिषेक समकालीन. दोघांमध्ये दोन गोष्टींचं साम्य: एकाला चालवायला एक बिमारू राज्य भेटलं तर दुसऱ्याला सततच्या दंगलींनी होरपळून निघणारं आणि दुसरं साम्य हे की एकाची नेमणूक पक्षांतर्गत असंतोषातून तर दुसऱ्याची नेमणूक अनागोंदी कारभारातून झालेली. आणि अजून एक साम्य म्हणजे दोघंही एकाच गोटातले. फरक इतकाच की एकाकडे कसलाच प्रशासकीय अनुभव नव्हता आणि एकाकडे केंद्रीय रेल्वे आणि कृषी मंत्रालायचा तसेच ८ महिन्यांच्या अल्पकाळाचा मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव होता. सुरुवातीला दोघांमध्ये निकोप गोडी होती आणि एकमेकांचं कौतुक ही होत. जसजसं काळ पुढे सरकू लागला तसतसं मोदींच्या मागे चौकशीचा आणि आरोपांचा ससेमिरा लागला. यातून मग मोदींपासून दुरावा राखणं ही नितीशजींची राजकीय गरज बनू लागली. पण ही राजकीय अपरिहार्यता हळूहळू तीव्र होत गेली, तिचं रूपांतर तिरस्कारात होऊ लागल आणि शेवटी अपमानात. अगदी मग युती करताना मोदींना प्रचारापासून दूर ठेवण्याच्या शर्थीही ठेवल्या आणि स्वीकारूही जाऊ लागल्या. स्थानिक राजकारणामुळ तसं करणं नितीशकुमारांची गरज आणि पक्षासाठी ते सहन करणं मोदींची मजबुरी बनत गेली. काळाच्या ओघात आणि मुठभर विरोधकांच्या अहोरात्र मेहनतीन मोदीजी राष्ट्रीय पर्याय म्हणून समोर आले तर नितीशजी राष्ट्रीय चेहरा. भाजपनं मोदीजीना आधी प्रचारप्रमुख आणि नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि नितीशजीनी स्वताला रालोआपासून वेगळं केलं. तसं मोदीजी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित होण्यामागं नितीशकुमारांचही योगदान अमुल्य. कारण त्यानी रालोआचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून सततचा तगादा लावला नसत तर कदाचित भाजपने तितक्या लवकर मोदींना तिलक लावला नसता आणि मोदींना इतका कालावधी मिळालाही नसता सर्वाना नेस्तनाबूत करायला. पण त्या क्षणी दोघांनी स्वताचे स्वतंत्र मार्ग पकडले आणि एका वर्तुळाकारी चाक्रव्ह्युवाला सुरुवात झाली.
नितीशकुमारांचा अहंकार आणि निर्णय बिहारी लोकांना आवडला नाही आणि त्यांनीही मताचे भरभरून दान मोदींच्या पारड्यात टाकलं इतकं की मोदी आणि त्यांचे सवंगडी वगळता सगळेच भुईसपाट झाले. त्या लाटेच्या तडाक्यात मोदीजी पंतप्रधान झाले आणि नितीशकुमारांना राजीनामा द्यावा लागला. तिथेच नाटकाचा दुसरं अंक चालू झाला फक्त बदलली ती पात्रं आणि त्यांच्या भूमिका आणि पुन्हा एका बदलाची सुरुवात तिथून झाली. इतके दिवस मोदीजी स्वताला प्रस्थापित करायला आणि नितीशजी त्यांना विस्थापित करायला लढत होते पण पण पण दुसऱ्या अंकाची सुरुवातच मुळी नितीशकुमारांनी स्वताला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आणि मोदीजीनी त्यांना विस्थापित करण्यासाठी म्हणजे पहिल्या अंकाच्या पूर्णपणे विरुद्धार्थी केली. दुसऱ्या अंकात अजूनही थोडासा बदल झालेला. मोदीजी देशविदेशात पडद्यावर अहोरात्र झळकू लागले, प्रशासन आणि शासन यांना सोबत घेऊन दौडे लागले, अडखळूही लागले. मधेच प्रचारकी वस्त्र नेसून लाखोंच्या सभा गाजवूही लागले. त्यांचे काही साथीदार खर्या आणि खोट्या गोष्टी पेरून त्यांचं प्रतिमवर्धन करू लागले. पहिल्या अंकात रणनीती शांतपणे राबवलेले अमित शहा रणनीतीकार बनून पुढे सरसावले अध्यक्ष बनून पक्ष आणि संघटना चालवू लागले. नितीशकुमार मात्र स्वताचा अहंकार बाजूला ठेऊन आपल्या जुन्या सहकाऱ्याच्या आणि मोठ्या विरोधकाच्या म्हणजे लालूजींच्या दारी गेले. तसं बिहारच्या राजकारणातला एकेकाळचा हा राजा फक्त २२ की २८ आमदारांसह मुख्य पडद्याहून गायब आणि प्रभावहीन झालेला. त्यामुळं पक्षासाठी नाही पण स्वताच्या पुढच्या पिढीला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनाही नवीन मित्राची- पर्यायाची गरज होतीच. पण लालूंच्या मनात थोडीशी अडी शिल्लक होती पण चाणाक्ष नितीशकुमारानी सोनिया गांधी यांची भेट घेऊन लालुना निर्वाणीचा संकेत दिला आणि ४ मोठ्या पक्षांची एक महाआघाडी जन्माला आली. आणि इकडे अमित शहानी ३ छोट्या पक्षांना सोबत घेऊन आपलीही आघाडी मजबूत केली. मुख्य सामना सुरु होण्याअगोदर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. मोदींनी शहांना सोबत घेऊन झारखंड हरियाना ही राज्य एकहाती तर महाराष्ट्र आणि जम्मू-काशीम ही राज्य जवळपास एकहाती काबीज केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून देऊन आणि दिल्लीत भाजपचे पूर्ण पानिपत करून जनतेनं एक वेगळा संदेशही दिला होता पण कौल समजून घेतील ते राजकारणी कसले. मिळालेलं यश म्हणजे कर्तुत्व आणि अपयश म्हणजे मतदारांची चूक असं गणित मनात बसलं की मग राजकीय प्रवास सोपा होतो पण मार्ग मात्र भाराकातोत जातो. आणि पुन्हा सावरतील ते राजकारणी कसले?????

(क्रमश.........)

Nivrutti Sugave..

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

असहीष्णूनांच्या सहिष्णू देशा !!!!!!!!!!

खूप पूर्वी कधीतरी वाचलेलं आठवत, "१ असत्य जर १००० वेळा बोललं तर ते सत्य भासायला लागतं". तसं याचाही बऱ्याचदा प्रत्यय आलेला पण आता मात्र त्यावर ठाम श्रद्धाच बसलीय. कारण हि तसं खासच आहे. पहावे तिकडं एकच गलका चालूय, देश असहिष्णू झालाय, असहिष्णू झालाय. बर जे म्हणतायेत देश असहिष्णू झालाय ती ही सगळी नामवंत मानसं. कलेच्या कुठल्या तरी क्षेत्रात नावाजलेली. आता इतकी नामवंत मानसं म्हणतायेत म्हणल्यावर पाणी कुठतरी मुरत असणारच. पण कुठे?????
सगळ्यात पहिल एक गोष्ट लक्षात आली, की जे नामवंत असहिष्णुता वाढली म्हणून प्रश्न विचारातायेत त्यांना विचारलेल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर मात्र देत नाहीयेत. तेव्हा मात्र थोडं उमजायला लागला की पाणी कुठं मुरतंय. तथाकथित असहिष्णुतेमुळे ज्यांना पुरस्कार परत केले ती नावं जरी डोळ्याखालून घातली तर या नाट्याची सगळी पटकथा उलगडू लागली. वाढत्या असहिष्णुतेला सध्याच्या सरकारला जबाबदार पकडून नयनतारा सयगल यांनी त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला. इतिहासात थोडासा डोकावल्यावर असं लक्षात आलं की त्यांना तो पुरस्कार १९८६ साली मिळाला, म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी यांच्या काळात. म्हणजे शिखांचे जे शिरकाण झाले १९८४ मध्ये त्याच्या फक्त २ वर्ष्यानी, त्या हत्याकांडानंतर "एखादा मोठा झाड निर्माळून पडलं की जमीन थोडीशी हलणारच" अशी थोतांड असहिषु भूमिका घेणाऱ्या सरकार कडून तो पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सहिष्णुता प्रेमाला काय झालेलं. त्या सरकारचा तो पुरस्कार नाकारून त्यांना तिथच सहिष्णुतेचे ४ धडे शिकवावे वाटले नाहीत. बर त्यानंतर ही देश शांत होता कायमच असही नाही. १९९० मधील काश्मिरी पंडितावर स्वताच घर-दार सोडून जायची वेळ आली, १९९२ साली किवा त्यानंतर झालेले बॉम्बस्पोठ दंगली अशा कुठल्याच वेळी त्यांना सहिष्णुतेचा पुळका आल्याचं किंवा पुरस्कार परत केल्याचं ऐकीव नाही. पण जस स्वताला मनापासून नकोस असलेला सरकार या देशात आलं, तसं बर्याच जणांच्या मनातील असहिष्णुतेला पालवी फुटू लागली. यातली बाकीची नावं पण पहा, अशोक वाजपेयी, के सत्चीदानंदन, सारा जोसेफ, आत्मजीत सिंग, काशिनाथ सिंग आणि बरीच. ही सगळीच्या सगळी मंडळी एनकेन मार्गे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी पंतप्रधान होऊ नयेत या एका अजेंड्यासाठी प्रतक्ष या अप्रतक्ष्य पणे अहोरात्र झटत होती. काही तर प्रत्यक्ष वाराणसीला ठाण मांडून होती. सहिष्णुतेच्या रक्षणाचा देखावा उभा करणाऱ्यांची असहिष्णुता तर बघा, अगोदर गळा फाडोस्तोवर टीव्ही वर ओरडत होती,मोदींना धर्मांद ठरवू पाहत होती, त्याचा उपयोग नाही झाला तर, एक "मोदी विरोधी अपील" करणारं पत्रक साईन केलं गेलं, त्याचाही उपयोग होईना मग भाजप वगळता जवळपास सगळ्या पक्षांना मोदींना थांबवा असं अर्जव करण्यात आलं. तेही नसे थोडके म्हणुनी थेट प्रचारात उतरली फक्त मोदी नको इतका टोकाचा असहिष्णू अजेंडा घेऊन. हे मान्य की घटनेन त्यांना कुणाविरुद्धही प्रचार करण्याचा अधिकार दिलाय पण स्वताला नको असलेल्या पण देशातल्या जनतेन बहुमतानं निवडून दिलेल्या व्यक्तीला आणि सरकारला नाकारण्याचा बहुमताचा अपमान करण्याचा अधिकार मात्र नाही. एखाद्या चुकीवर बोट ठेवण्याचा त्या जबाबदारास जाब विचारण्याचा अधिकार आहे पण त्याआडून स्वताच्या पूर्ण न झालेल्या इच्छेचा बदला घेण्याचा अधिकार नाही. बर यांच्या असहिष्णुतेचा कळस बघा. ही लोकं रोज जनतेला कुठल्या तरी चानेल वर बसून धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजतच असतात. पण यांच्यातलेच एक माननीय लोकसभेच्या निवडणुकीत वाराणसीतून कशे tweet करत होते? " मुस्लीम मत फुटण्यापासून थांबवण्यात आम्ही यशस्वी होत आहोत". म्हणजे धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण करणारी मानसं त्याच तोंडानं सर्वसामान्यांना धर्मनिरपेक्षतेचे कीर्तन ऐकवणार.
यांचा अजून एक आक्षेप कायम असतो की मोदींची कार्यशैली ही हिटलर सारखी आहे. १० वर्ष एखाद्या न केलेल्या गुन्ह्यासाठी एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सहन करून पण ती वागणूक देणार्यांशी प्रेमानं वागलेलं हिटलर आम्ही तरी ऐकला नाही. देशातल्या सगळ्यात मोठ्या पदावर विराजमान होताना डोळे भरून आलेला त्याच आसनापुढे नतमस्तक झालेला हिटलर आम्ही तरी वाचला नाहीये. "जग हे एक कुटुंब" ही शिकवण उरी बाळगून जगणारा हिटलर खरच कधी वाचला नाहीये. बहुधा या शहाण्या माणसांच्या वाचण्यातला आणि आकलनातला हिटलर इतका नम्र असावा. आणि विरोधाभास बघा, की उठसुठ कुणाला तरी अकारण हिटलर म्हणून हिणवणारी मानसं स्वत मात्र हिटलरचे तत्वज्ञान पाळताना दिसतात. हिटलर थोडासा जरी वाचला तरी लक्षात येईल की त्यानी  त्याची फौज किंवा त्यासाठी लढणारी फळी नेहमीच एका समाजाची भीती दाखवून, ज्यू लोकांचा बागुलबुवा उभा करूनच उभी केली. म्हणजे कुठल्यातरी समूहाच्या तिरस्कारतुनच त्याचा अत्याचारी लढवू बाणा जन्मलेला. थोडसं बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णुतेच्या नाटकी रक्षकांनी स्वताच्या हेतूपूर्ततेसाठी या तत्वज्ञाचा पुरेपूर उपयॊग केलाय. मोदी नावच्या व्यक्तीला देशापुढ आणि जगापुढ एखाद्या राक्षसारख प्रस्तुत करून स्वताचा हेतू साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मोदी नावाची हवी तशी प्रतिमा उभी करून कधी अल्पसंख्याकांना तर कधी सर्वसामान्यांना घाबरवून स्वताच्या किवा माग उभं करण्याचा खेळ खेळण्यात आला. त्यात अपयश आलं किंवा येत गेलं तसतसा काहींचा आक्रस्ताळेपणा वाढतच गेला. म्हणजे उठसुठ लोकशाहीचा गुणगान करणाऱ्यांच्या पचनी बहुमताचा निर्णय पडू यापेक्षा मोठी ती शोकांतिका काय? आता जनतेन तो कौल दिलाच आहे, त्यांच्या नाटकाचा पहीला अंक अपयशी झालाच आहे तर आता लगेच दुसरा अंक सुरु झाला. काय तर म्हणे देश असहिष्णू झालाय? असंकसं अचानक १४ महिन्यात असहिष्णू झाला. हा देश काल ही सहिष्णू होता आणि आजही आहे. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच ४० वर्ष्यांपेक्षा जास्त काळ एकाच घराण्याची सत्ता सहन करू शकलाय. या देशानं आणीबाणी सहन केली आणि त्यानंतर दुसऱ्याच निवडणुकीत त्याच इंदिराजीना पूर्ण बहुमत दिलंय हे केवळ साहिश्नुतेमुळे. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच फक्त भावनेच्या भरात नवख्या राजीवजीना ४०० पेक्ष्या जास्त खासदारांचा नजराणा दिलेला.हा देश सहिष्णू आहे म्हणूच १० वर्ष रिमोट वर चालणारं सरकार या देशांना गपगुमानानं सहन केलं. हा देश सहिष्णू होता म्हणूनच तर कुठल्याही घटनात्मक पदावर नसलेले राहुल गांधी देशाच्या मंत्रीमंडळानं सर्वानुमते घेतलेला निर्णय निव्वळ मूर्खपणा म्हणून पत्रकार परिषदेत फाडू शकले तेही देशाचा पंतप्रधान UNO च्या मीटिंगसाठी परदेशी असताना आणि याच चुकीला काही नामवंत शहाणे कुणाची तरी सहिष्णुता म्हणून सांगू शकले. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच भ्रष्टाचाराचे आकडे लाखो कोटींची मजल गाटु शकले. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच हुकुमशाहीपणे देश आणि पक्ष चालवू शकणारे लोकशाहीचे गीत दाखवण्यापुरत तरी गाऊ शकतात.
आणि या सर्वाना मदत झाली ती कमकुवत आणि पक्षपाती झालेल्या चौथ्या खांबाची. मुळात आजकालचे बरेच नामवंत पत्रकार आणी संपादक पत्रकारिता सोडून स्वताचे अजेंडे चालवू आणि राबवू पाहत आहेत. बर्याच पत्रकारांची लेखणी आणी वाणी ही एखाद्या समूहाची किवा एखाद्या विचारप्रवाहाची बटिक झाली आहे. त्यांच्या मतप्रवाहात जे जे बसत फक्त तेच सत्य आणि बरोबर, बाकी सगळं असत्य, भ्रष्ट आणि चुकीचा अशी ठाम समजूत घेऊनच काही मंडळी कार्यरत आहे. त्यांना पटणाऱ्या एखाद्या व्येक्तीची प्रत्येक गोष्ट बरोबर वा बरोबर हेतूनं केलेली असते आणि न पटनार्याची प्रत्येक गोष वाईट वा साशंक. म्हणूनच मोदींचा प्रत्येक निर्णय हुकुमशाही म्हणूनच पेश करणारे काही उठावळ पत्रकार आणि संपादक " इंदिराजीना विरोधकामूळच कशी आणीबाणी लादावी लागली किंवा इंदिराजीकडा कसं आणीबाणी लावण्याशिवाय गत्यंतर नव्हता" हे पटवून सांगण्यात स्वताची वाणी आणि लेखणी खर्ची घालू शकतात. आणि ते निर्भीडपणे असं पक्षपातीपणा करू शकतात हेच देशाच्या सहिष्णुतेचा मोठा पुरावा आहे.
फक्त आता एकच सांगावसं वाटतं की नाटकाचा दुसरा अंक खूपच किळसवाना आणि बेचव झालाय. त्यामुळं हे असहिष्णुतेचा रडगाणं थांबवून स्वताच हसू करून घेणं थांबवावं. कारण सर्वसामान्य जनता ही नाटक कंपनी वागत असलेली असहिष्णुता न ओळखण्याइतकी दुधखुळी राहिलेली नाहीये. खायचे आणि दाखवायचे असे सगळे दात आता पाहण्याइतकी राजकीय समज बहुतांशजणांकडे आलेली आहे. आणि जनता सरकारच्या चुकांवरती तुमचे शाब्दिक आणि मौखिक आसूड पाहू इच्छित आहे, चुकीचे अप्रामाणिक आणि पक्षपाती आसूड नाही....!!!!!!

निवृत्ती सुगावे.

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

१. सुरुवात

प्रत्येक व्येक्तीच्या काही मुलभूत गरजा असतात पण एका जागरूक व्येक्तीच्या काही अतिरिक्त गरजा असतात. जसं की व्येक्त होणं.
आजूबाजूच्या घडामोडी पाहून मन कधी प्रफुल्लीत होतं तर कधी अंतर्मुख. या ब्लॉग च्या मधेमातून ते व्यक्त होऊ लागेल.