तसं पहायला गेलं तर आत्ता २०१६ ची सुरुवात आहे. २०१९ उजाडायला आणि लोकसभेच्या निवडणुकीला ३ वर्ष इतका दीर्घ कालावधी आहे. आणि २०१९ पूर्वी केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश गुजरात, राजस्थान, कर्नाटक अशा बऱ्याच राज्यातील निवडणुका होणार आहेत. यातील प्रत्येक निवडणुकीच वेगळ असं महत्व नक्कीच आहे. या प्रत्येक निवडणुकीतून होणारी पायाभरणी, जन्माला येणारी गटबंधनं ही येत्या लोकसभेला धरूनच असतिल. लोकसभेनंतरच्या काही राज्यांमध्ये भाजपचे विजयी अश्व दौडत रहिले आणि पहिला अडथळा आला तो दिल्ही election मधे ७० आमदारांच्या विधानसभेत ३२ आमदारांचा भाजप हा केवळ ३ वर येउन थांबला. इथंच सावरायची संधी असताना आपली चूक अपघात समजून भाजप पुन्हा त्याच चुका करत पुढे चालू लागला आणि जबर दणका भेटला तो बिहार मधे. एकहाती सत्तेचे स्वप्न पाहणारा भाजप ६० जागांच्या अलीकडे गुंडाळला गेला आणि इथून बऱ्याच गोष्टी नव्याने सुरु झाल्या. भाजपमध्ये पहिल्यांदाच अमित शहांच्या नेतृत्वगुणांवर प्रश्न उभे केले गेले. तर इकडे कॉंग्रेस मधे राहुल गांधीना आघाडीचे शिल्पकार ठरवून स्थापित केले जाऊ लागले. स्वतःच्या अहंकाराने राजकीय पटलावरून काहीसे बाजूला गेलेले नितीशकुमार कनिष्ठ का होईना पण नव्या रुपात परतले पण अर्थात स्वताच संख्याबळ घटवून आणि बरोबरच स्वतःच्या राष्ट्रीय महत्वकांक्षेला पुन्हा आशेची पालवी फ़ुतुन. बिहारच्या election नी एका कल्पनेला जन्म दिला आणि ती म्हणजे "बिगरभाजपवाद" आणि हि कल्पना घेऊनच बऱ्याच पक्षांचा २०१९ च्या दिशेने प्रवास सुरु झाला अर्थात तो कॉंग्रेसचाही सुरु झाला फक्त विरुद्ध दिशेने….….
बिहार election न एक अपरिहार्यता आणि एक hope जन्माला घातली. अपरिहार्यता ही की भाजपला थांबवायला पक्षांना एकत्र येउन लढा द्यावा लागेल आणि hope हि की बिगरभाजप पक्षांनी एकत्र येउन लढा दिला तर भाजप ला पराभूत करणं दिसत होतं तितकंही अवघड नाही पण पुन्हा याचा अतिरेक भाजपच्याच पथ्यावर पडणारा असेल.
कितीही नाकारलं तरी भाजप आणि कॉंग्रेस वगळता इतर कुठलाही पक्ष स्वबळावर किंवा स्वनेतृत्वात सत्ता स्थापन करण्याचा विचार करू शकेल असा नाही. म्हणजे २०१९ चा विचार केला तर भाजप आणि कॉंग्रेस हे दोनच पर्याय आहेत. त्यातल्या कॉंग्रेस या पर्यायाचा विचार केला तर गणित खूप सोपं होइल. बिहार election मधे RJD आणि JDU या २ मोठ्या भावामधे विधानसभेला कॉंग्रेस च्या वाट्याला जेमतेम ४० जागा आल्या. बिहार मधील सरकार २०२० च्या शेवटपर्यंत सत्तेवर असेल म्हणजे येती लोकसभा कॉंग्रेसला बिहारमधे आघाडी करूनच लढावी लागेल आणि आताच्या हिशोबान जागावाटप झालं तरी कॉंग्रेसच्या पारड्यात ८-१० जागा पडतील त्यातून जिंकतील किती हा पुढचा प्रश्न. बिहारमधील तथाकथित यशानं येत्या काही निवडणुका कॉंग्रेस न आघाडी करूनच लढ्याचा चंग बांधलेला दिसतोय. पश्चिम बंगाल मधे अस्तित्वाची लढाई लढणारे डावे आणि देशभर अस्तित्वासाठी झटणारे कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र यायला आतुरलेले आहेत. त्यात डावे हे नाही म्हणालं तरी बंगालमधे चांगलं अस्तित्व राखून आहेत आणि कॉंग्रेस मात्र अगदी नगन्य. म्हणजे या २ पक्षांनी विधानसभा एकत्रित लढली आणि निसटता पराभव किंवा विजय मिळवला तर पुन्हा येती लोकसभा एकत्र लढण ओघाने आलेच आणि कॉंग्रेसची ताकद विचारात घेतली तर ४२ पैकी १५-२० इतक्या जागाही अभावानेच कॉंग्रेसच्या वाट्याला येतिल. उत्तर प्रदेश मधे सुधा BSP सोबत जाण्याचा कॉंग्रेसचा मनोदय दिसतोय तसं झालं तर पुन्हा लोकसभेसाठी कॉंग्रेस ८० पैकी किमान ५० जागा तरी न लढताच गमावून बसेल. तामिळनाडूमधेही कॉंग्रेस अदखलपात्र पण DMK सोबत natural alliance झाली तर तिथेही ३९ पैकी पुन्हा १५-२० जागा वाट्याला येतिल. आंध्रासारख्या राज्यात ३१ खासदारांची कॉंग्रेस २ वर आलिय. आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यात कॉंग्रेस एकटी लढली तर खूप मोठी काही मजल मारू शकेल अशी स्थिती नाही आणि एखादा ताकतवर मित्र भेटला तरी या दोन्ही राज्यात मिळून कॉंग्रेसच्या वाट्याला ४२ पैकी फारफार तर १५ जागा वाट्याला येतील. महाराष्टाचा विचार करायचा तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तुल्यबळ आणि तरीही कॉंग्रेसच्या वाट्याला मोठ्या भावाची भूमिका आली तर २५-२८ जागा लढायला भेटतील आणि महाराष्ट्रात हे २ पक्ष एकत्र निवडणूक लढवतील याची शक्यता अधिक. जम्मू-काश्मीर मध्ये Natinal Conference आणि कॉंग्रेस एकत्र निवडणुकीला सोमोर जाण्याचा पर्याय निवडतील याची शक्यता अधिक आणि तसा झाला तर तिथेही कॉंग्रेस ६ पैकी जेमतेम २-३ ठिकाणी निवडणूक लढवू शकेल. कर्नाटक मधील सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेस कदाचित JD(S) सोबत election ला सामोरे जाऊ शकतो आणि तस झाल तर तिथे मात्र कॉंग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आणि कदाचित तिथ २८ पैकी १८-२० जागा या कॉंग्रेसच्या वाट्याला येतिल. झारखंड या राज्याचा विचार केला तर आजघडीला ८० आमदारांपैकी फक्त ६ आमदार कॉंग्रेस चे आहेत तर १८ आमदार JMM पक्षाचे. म्हणजे आघाडीची मानसिकता बळावली तर कॉंग्रेस JMM सोबत जाण्याचा पर्याय निवडू शकतो कारण केंद्रात आणि राज्यातसुद्धा या २ पक्षांनी एकत्र सत्ता राबवली आहे. म्हणजे हि शक्यता खरी झाली तर पुन्हा १४ पैकी ४-६ कॉंग्रेस च्या वाट्याला येतील. तटस्थपणे पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथील अंदाजीत आघाडी उभी राहण्याची शक्यता थोडी कमिच. उत्तर प्रदेश मधे कॉंग्रेस भाजप, सपा, बसपा वगळता इतर पक्षांची मोट बांधून election ला सामोरे जाऊ शकतो पण अर्थातच तो कॉंग्रेससाठी दुसरा पर्याय पण प्राप्त परस्थितीत अधिक शक्यता असलेला.
आता एकत्रित विचार केला तर बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांमधे लोकसभेच्या साधारणपणे २७० जागा आणि कॉंग्रेस च्या वाट्याला येतील त्या १०० ते ११५ आणि आंध्र व कर्नतकमधेही आघाडी झाली तर कॉंग्रेस च्या वाट्याला पुन्हा ७० पैकी ३३-३५ जागा म्हणजे या नऊ राज्यांमधे कॉंग्रेस ३४० पैकी १९०- २१० ठिकाणी लढायला उभाही नसेल. म्हणजे जवळपास ३५% ठिकाणी कॉंग्रेस election लढत सुधा नसेल. बाकी गुजरात, दिल्ही अशा काही राज्यांमधे कॉंग्रेस दखलपात्रसुद्धा नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इथिल भाजपचे स्थानिक नेतृत्वच पुरून उरलेल आहे. पंजाब सारख्या राज्यात कॉंग्रेस पहिल्या ३ मधे सुद्धा नाही अरुणाचल प्रदेश आसाम सारख्या राज्यात पक्षात मोठी फुट पडलेली आहे.
एकंदरीत कॉंग्रेस आघाडीच्या मानसिकतेत गुंतत गेली तर भारतातला दुसरा सगळ्यात मोठा पक्ष हा २०१९ च्या election पूर्वीच सत्तेच्या स्पर्धेतून बाहेर पडलेला असेल. आणि यापेक्षा अधिक चिंतेची बाब ही की सध्याच कॉंग्रेसच नेतृत्व इतका दूरचा धोका पाहू शकेल इतकं प्रगल्भ नाहीये आणि त्यांच्या तसं लक्षात आणून देऊ शकेल अशा मनस्थितीत कुठलाच नेता नाही. कॉंग्रेस जोपर्यंत हे सगळा समजून घेणार नाही तोपर्यंत तो २०१९ च्या election साठी पळत राहील पण फक्त विरुद्ध दिशेने………
बिहार election न एक अपरिहार्यता आणि एक hope जन्माला घातली. अपरिहार्यता ही की भाजपला थांबवायला पक्षांना एकत्र येउन लढा द्यावा लागेल आणि hope हि की बिगरभाजप पक्षांनी एकत्र येउन लढा दिला तर भाजप ला पराभूत करणं दिसत होतं तितकंही अवघड नाही पण पुन्हा याचा अतिरेक भाजपच्याच पथ्यावर पडणारा असेल.
कितीही नाकारलं तरी भाजप आणि कॉंग्रेस वगळता इतर कुठलाही पक्ष स्वबळावर किंवा स्वनेतृत्वात सत्ता स्थापन करण्याचा विचार करू शकेल असा नाही. म्हणजे २०१९ चा विचार केला तर भाजप आणि कॉंग्रेस हे दोनच पर्याय आहेत. त्यातल्या कॉंग्रेस या पर्यायाचा विचार केला तर गणित खूप सोपं होइल. बिहार election मधे RJD आणि JDU या २ मोठ्या भावामधे विधानसभेला कॉंग्रेस च्या वाट्याला जेमतेम ४० जागा आल्या. बिहार मधील सरकार २०२० च्या शेवटपर्यंत सत्तेवर असेल म्हणजे येती लोकसभा कॉंग्रेसला बिहारमधे आघाडी करूनच लढावी लागेल आणि आताच्या हिशोबान जागावाटप झालं तरी कॉंग्रेसच्या पारड्यात ८-१० जागा पडतील त्यातून जिंकतील किती हा पुढचा प्रश्न. बिहारमधील तथाकथित यशानं येत्या काही निवडणुका कॉंग्रेस न आघाडी करूनच लढ्याचा चंग बांधलेला दिसतोय. पश्चिम बंगाल मधे अस्तित्वाची लढाई लढणारे डावे आणि देशभर अस्तित्वासाठी झटणारे कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र यायला आतुरलेले आहेत. त्यात डावे हे नाही म्हणालं तरी बंगालमधे चांगलं अस्तित्व राखून आहेत आणि कॉंग्रेस मात्र अगदी नगन्य. म्हणजे या २ पक्षांनी विधानसभा एकत्रित लढली आणि निसटता पराभव किंवा विजय मिळवला तर पुन्हा येती लोकसभा एकत्र लढण ओघाने आलेच आणि कॉंग्रेसची ताकद विचारात घेतली तर ४२ पैकी १५-२० इतक्या जागाही अभावानेच कॉंग्रेसच्या वाट्याला येतिल. उत्तर प्रदेश मधे सुधा BSP सोबत जाण्याचा कॉंग्रेसचा मनोदय दिसतोय तसं झालं तर पुन्हा लोकसभेसाठी कॉंग्रेस ८० पैकी किमान ५० जागा तरी न लढताच गमावून बसेल. तामिळनाडूमधेही कॉंग्रेस अदखलपात्र पण DMK सोबत natural alliance झाली तर तिथेही ३९ पैकी पुन्हा १५-२० जागा वाट्याला येतिल. आंध्रासारख्या राज्यात ३१ खासदारांची कॉंग्रेस २ वर आलिय. आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यात कॉंग्रेस एकटी लढली तर खूप मोठी काही मजल मारू शकेल अशी स्थिती नाही आणि एखादा ताकतवर मित्र भेटला तरी या दोन्ही राज्यात मिळून कॉंग्रेसच्या वाट्याला ४२ पैकी फारफार तर १५ जागा वाट्याला येतील. महाराष्टाचा विचार करायचा तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तुल्यबळ आणि तरीही कॉंग्रेसच्या वाट्याला मोठ्या भावाची भूमिका आली तर २५-२८ जागा लढायला भेटतील आणि महाराष्ट्रात हे २ पक्ष एकत्र निवडणूक लढवतील याची शक्यता अधिक. जम्मू-काश्मीर मध्ये Natinal Conference आणि कॉंग्रेस एकत्र निवडणुकीला सोमोर जाण्याचा पर्याय निवडतील याची शक्यता अधिक आणि तसा झाला तर तिथेही कॉंग्रेस ६ पैकी जेमतेम २-३ ठिकाणी निवडणूक लढवू शकेल. कर्नाटक मधील सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेस कदाचित JD(S) सोबत election ला सामोरे जाऊ शकतो आणि तस झाल तर तिथे मात्र कॉंग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आणि कदाचित तिथ २८ पैकी १८-२० जागा या कॉंग्रेसच्या वाट्याला येतिल. झारखंड या राज्याचा विचार केला तर आजघडीला ८० आमदारांपैकी फक्त ६ आमदार कॉंग्रेस चे आहेत तर १८ आमदार JMM पक्षाचे. म्हणजे आघाडीची मानसिकता बळावली तर कॉंग्रेस JMM सोबत जाण्याचा पर्याय निवडू शकतो कारण केंद्रात आणि राज्यातसुद्धा या २ पक्षांनी एकत्र सत्ता राबवली आहे. म्हणजे हि शक्यता खरी झाली तर पुन्हा १४ पैकी ४-६ कॉंग्रेस च्या वाट्याला येतील. तटस्थपणे पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथील अंदाजीत आघाडी उभी राहण्याची शक्यता थोडी कमिच. उत्तर प्रदेश मधे कॉंग्रेस भाजप, सपा, बसपा वगळता इतर पक्षांची मोट बांधून election ला सामोरे जाऊ शकतो पण अर्थातच तो कॉंग्रेससाठी दुसरा पर्याय पण प्राप्त परस्थितीत अधिक शक्यता असलेला.
आता एकत्रित विचार केला तर बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांमधे लोकसभेच्या साधारणपणे २७० जागा आणि कॉंग्रेस च्या वाट्याला येतील त्या १०० ते ११५ आणि आंध्र व कर्नतकमधेही आघाडी झाली तर कॉंग्रेस च्या वाट्याला पुन्हा ७० पैकी ३३-३५ जागा म्हणजे या नऊ राज्यांमधे कॉंग्रेस ३४० पैकी १९०- २१० ठिकाणी लढायला उभाही नसेल. म्हणजे जवळपास ३५% ठिकाणी कॉंग्रेस election लढत सुधा नसेल. बाकी गुजरात, दिल्ही अशा काही राज्यांमधे कॉंग्रेस दखलपात्रसुद्धा नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इथिल भाजपचे स्थानिक नेतृत्वच पुरून उरलेल आहे. पंजाब सारख्या राज्यात कॉंग्रेस पहिल्या ३ मधे सुद्धा नाही अरुणाचल प्रदेश आसाम सारख्या राज्यात पक्षात मोठी फुट पडलेली आहे.
एकंदरीत कॉंग्रेस आघाडीच्या मानसिकतेत गुंतत गेली तर भारतातला दुसरा सगळ्यात मोठा पक्ष हा २०१९ च्या election पूर्वीच सत्तेच्या स्पर्धेतून बाहेर पडलेला असेल. आणि यापेक्षा अधिक चिंतेची बाब ही की सध्याच कॉंग्रेसच नेतृत्व इतका दूरचा धोका पाहू शकेल इतकं प्रगल्भ नाहीये आणि त्यांच्या तसं लक्षात आणून देऊ शकेल अशा मनस्थितीत कुठलाच नेता नाही. कॉंग्रेस जोपर्यंत हे सगळा समजून घेणार नाही तोपर्यंत तो २०१९ च्या election साठी पळत राहील पण फक्त विरुद्ध दिशेने………
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा